
मात्र, दोघांमधील करारानुसार आता त्यांच्या लग्नाचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता सायली अर्जुनपासून दूर आपल्या घरी निघून जाणार आहे. त्यांचा संसार आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, आता हा रोमँटिक हनिमून दोघांच्या आयुष्यात काहीतरी खास वळण घेऊन येण्याची शक्यता आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये दोघांचा रोमान्स बघायला मिळणार आहे.







