
तेजस्विनी पंडित हिच्या आयुष्यात एक काळ इतका संघर्षमय आला होता की, तिला पडेल ते काम करावे लागत होते. आपल्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल स्वतः तेजस्विनी पंडित एका कार्यक्रमात बोलली होती. हा काळ तेव्हा होता, जेव्हा तेजस्विनीच्या कुटुंबावर बरंच कर्ज झालं होतं. लोकांचं कर्ज फेडायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. घरातील जुजबी गोष्टींसाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी बील न भरल्याने त्यांच्या घराची वीज देखील कापली गेली होती. यावेळी तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबाने तब्बल अडीच महिने मेणबत्तीच्या प्रकाशात काढले.








