
या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर, गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत. ‘टीडीएम’ चित्रपटातील नवखे चेहरे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदीने या गाण्यावर धरलेला ठेका नेत्र दिपवणारा आहे. हे नवखे कलाकार आहेत हे बोलणंच मुळात चुकीचं वाटतंय इतकी निरागसता, इतकी समज त्यांच्या भूमिकेत दिसत असून ही किमया नामवंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.






