
तेवढ्यात आता मालिकेत कार्तिक देवराज या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत आहे. अशा प्रकारची भूमिका सुयशने कधी केली नाही. त्याच्या वेशाची विशेष चर्चा होईल यात शंका नाही. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल. तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.






