
पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कलंक हा शब्द वापरून चूक केली असं वाटतं का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. उद्धवजींनी अजिबात चूक वगैरे केलेली नाही. ते योग्यच बोलले. कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.





