
मध्यंतरी या मालिकेत नवे वळणे आले. अभीचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकवर्गाने नाराजी व्यक्त केली होती. पण, त्यानंतर अभी आणि लतिकाच्या चिमुकल्या मुलीची एंट्री दाखवण्यात आली आणि पुन्हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र,आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकताच शुटिंग पूर्ण झाले आहे.








