
मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘फँड्री.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दहा वर्षे उलटून गेली आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. या चित्रपटात दोघांनी जब्या व शालूची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे. आता या चित्रपटातील कलाकारांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.