
मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमलेल्या लोकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी भन्नाट शक्कल लढवली. लोकांनी पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात घडली आहे.







