
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरात रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फ घेऊन जाताना बोट उलटली. या बोटमध्ये एकूण सात जण होते. यातील तिघांनी पोहून किनारा गाठला. तर, दोन जणांचा बुडून मृत्यू झाला असून इतर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. वेंगुर्ला बंदरात शोध मोहिम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळ माजली आहे.







