
शिवने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या एक्स-गर्लफ्रेंड वीणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “उगाच कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर बोलता, त्यानंतर उगाच होत नाही. कारण तुम्ही भूतकाळात काही गोष्टी केल्या असतात. तुमच्यासाठी तो बाँड, ते नाते खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे नाते संपल्यानंतरही समोरच्याला इजा न होऊ देता तुम्ही ते कसे जपता हे महत्त्वाचे आहे, कारण तो बाँड आणि नाते तुमचे होते, तुमच्या कुटुंबाचे नाही. काही गोष्टी आमच्या दोघांनाच माहीत होत्या, आमच्या कुटुंबाला नाही आणि लोकांनाही नाही. त्या गोष्टी मी जशा हाताळायला हव्या होत्या तशा मी हाताळल्या.”







