
पुढे शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून होणारा यंत्रणेचा गैरवापर जर टाळायचा असेल, तर सोशल मीडिया हाच एक पर्याय आहे. सोशल मीडियाच्या माध्यातून आपण त्यांच्यावर हल्ला केला तर राज्यकर्ते हे परत करण्याच्या आधी विचार करतील. तुम्ही जागरूक राहिले पाहिजे, तुमच्यातील एकावर हल्ला झाल्यास ५० जणांनी उत्तर दिले आहे. अशाने तुमच्यावर हल्ला करणारे नक्कीच थांबतील”, असाही त्यांनी सल्ला दिला आहे.






