
आम्हाला शिवसेना आणि भाजपला एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, पण अजित पवारांना राजकारणातील काही गोष्टी कळालेल्या नाहीत, असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्याची गोष्ट जरूर बोललो असेल, पण तसं काही केलं नाही, आम्ही आमचा रस्ता कधी सोडला नाही.




