
१९८३साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात शाहीर विठ्ठल उमप यांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्यांनी ‘अबक दुभक तिभक’, ‘बया दार उघड’, ‘खंडोबाचं लगीन’ अशी नाटके देखील गाजवली. एकतारी, दिमडीवरचे भजन, नाथांची भारूडे, पाळणे, पोवाडे, कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही त्यांनी केले होते.







