
या गूढ ‘मनोरमा’चं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी, अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे. अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय? त्रिनयना देवीचं वरदान असलेली ती तिसरी स्त्री कोण? मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का… याची उत्तरंही प्रेक्षकांना मालिका पाहताना मिळणार आहेत.








