
ओवी आपल्या मनाची समजूत घालून उमा सोबत तिच्या घरात राहत असली तरी, तिला पावलोपावली आपल्या आईची आणि परदेशातील घराची आठवण येत आहे. संध्याच्या कार्याच्या दिवसही पुन्हा एकदा ओवीला आपल्या आईची आठवण येणार आहे. ओवी तिच्या आईला म्हणजेच संध्याला अबोलीची फुलं आवडायची म्हणून ओंजळभर फुलं घेऊन नदीच्या काठी जाऊन ती आईच्या आठवणीत तिला श्रद्धांजली म्हणून वाहणार आहे. ‘मला इथे राहणं कठीण झालं आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आई’, असं ओवी बोलत असताना निशी ऐकणार आहे.






