
नीरज आपल्या अपहरणाची बातमी ही लपवतो कारण हे सर्वानाच माहिती आहे की जर ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला गोष्टी अजून चिघळलेल्या नको आहेत. पण उमाच्या मनात शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते, उमा अजून ही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजच सत्य समोर येताच. नीरजचे कोणते सत्य कळलय रघुनाथला खोतांना ? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल ? असे प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.