
शिवसेनेतील बंडखोर ४० लोकांनी लावलेला कलंक आम्ही धुवून काढू, भ्रष्टाचाऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी दोर, फास देण्याचं काम आम्ही करू, बेईमानीचा डाग पुसून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही पापमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मंत्री दादा भूसे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर संजय राऊतांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे देखील आरोप केले आहे. त्यामुळं आता संजय राऊतांच्या गंभीर आरोपांमुळं शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.




