
विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५ जागांचे प्रचंड यश मिळाले असून एकट्या भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास केवळ १३ जागांची आवश्यकता आहे. भाजपचे मित्रपक्ष व काही अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला असून मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार हे जवळपास पक्के झाले आहे. आता मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडला. वरिष्ठ नेते म्हणून मोदी शहा जो निर्णय घेतली तो जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच तो शिवसेनेसाठीही अंतिम असेल असे शिंदेंनी जाहीर केले. त्यांच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.