
Sanjay Raut on NDA Alliance : लोकसभा निवडणुकी नंतर सत्तास्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी प्रयत्न सुरू केले आहे. टीडीपी आणि जेडीयूने मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काल एनडीएच्या नेत्यांची बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काल इंडिया आघाडीची देखील बैठक झाली. यात इंडिया आघाडीचे २८ नेते उपस्थित होते. भारतातील जनतेने मोदींच्या विरोधात कौल दिला असल्याचं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले असून त्यामुळे इंडिया आघाडी कडून त्यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्याकरता जुळवाजुळ सुरू करण्यात आली आहे. या बाबट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका करत सूचक वक्तव्य केले आहे.








