
Sanjay Raut News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तीन ते चार नावांची निवड केली होती, पण त्यात शिवसेना यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नव्हते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.