
नेमका वाद काय?
मुंबईतीलसहा लोकसभा मतदारसंघापैकीउत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम इच्छुक होते. ही जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यानंतर येथून अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर निरुपम यांनी ठाकरे गटासह अमोल किर्तीकरांवर खिचडी चोरीचे आरोप केले. काँग्रेसवर टीका करताना निरुपम म्हणाले की, काँग्रेस ठाकरे गटापुढे नमली आहे. यामुळे पक्षाचे अस्तित्व संपेल. युपीप्रमाणे मुंबईतही काँग्रेसची बिकट अवस्था होईल.







