
Sangli Grapes fram issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान बदल होत आहे. कधी तापमानात वाढ, तर कधी घट, तर कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस. याचा गंभीर परिमाण हा द्राक्ष बागांवर झाला आहे. यामुळे द्राक्षांच्या घडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होत आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात तब्बल २५० कोटी रुपयांची द्राक्ष शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागली आहे.




