
या अपघातात सुदैवाने कोणताही जिवीत हानी झाली नाही. मात्र चालकासह काही प्रवासी जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसारअशोका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (एमएच ०९ जीजे ५४५४) ही रात्रीच्या सुमारास मिरजेकडून सांगलीमार्गे मुंबईकडे निघाली होती. विश्रामबागजवळ सांगलीकडे येताना कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बँकेजवळ चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसले. वटवाघूळ चालकाच्या हाताला चिटकल्यामुळे चालकाने हात झटकला. या प्रयत्नात चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या उतारावरून खाली येत सार्वजनिक बागेच्या कुंपणावर आदळली.







