Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान!

0
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान!


मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या दोन टप्प्याचे उद्घाटन झाले असून आता भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. सोमवारी (४ मार्च) हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या टप्पा वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर समृद्धी महामार्गाने नागपूरहून येणाऱ्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यानंतर  इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीचा प्रवाश वेगवान होणार असून आता मुंबईतून शिर्डीला अवघ्या एका तासात पोहोचता येणार आहे. त्याचबरोबर शेतीमालही जलदगतीने मुंबईला पाठवता येणार आहे. 



Source link