
समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात ३५८ अपघाताच्या घटना समोर आल्या असून ९५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत दिली आहे.वेग मर्यादेचे उल्लंघन, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, नियमबाह्य पद्धतीने वाहनेपार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे आदि समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे.





