
यावेळी राजामौली यांना चित्रपटाच्या सीक्वलबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना एसएस राजामौली सांगितले की, ऑस्कर पटकावल्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वलच्या कामाला वेग येईल. या चित्रपटाची पटकथा विजयेंद्र प्रसाद लिहित आहेत, याची माहिती देखील त्यांनी दिली. एसएस राजामौली, एमएम कीरावानी यांच्यासोबतच्या ऑस्कर आफ्टर पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना एका मुलाखतीत ‘आरआरआर २’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबद्दल आताच फार काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.






