
वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश देशमुख म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे,साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका नव्हती. वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो,असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं.






