
आशुतोष यांनी फोनवर एक कविता ऐकवत रेणुकाला प्रपोज केलं. त्यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता रेणुकाने त्यांना होकार दिला. तीन वर्षांनंतर त्यांनी रेणुकाला लग्नाबद्दल विचारलं. मात्र आशुतोष गावाकडचे असल्याने आणि त्यांचं कुटुंब मोठं असल्याने रेणुकाला थोडी भीती वाटत होती. शिवाय रेणुका तेव्हा घटस्फोटित होती. रेणुकाचा मराठी अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आशुतोष यांनी रेणुकासोबत लग्नगाठ बांधली. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं देखील आहे.






