Ravi kishan | “पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेव शांत झाले”, रवी किशन यांचा अजब दावा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Ravi kishan | “पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेव शांत झाले”, रवी किशन यांचा अजब दावा | Navarashtra (नवराष्ट्र)


“पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेव शांत झाले”, रवी किशन यांचा अजब दावा

Ravi kishan on narendra modi : आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु असून मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधनेबद्दल अजब दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यानंतर काही मिनिटात एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. याचदरम्यान भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेबद्दल अजबच दावा केला आहे. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशन यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान आणि उष्माघाताबद्दल सांगितले. रवी किशन यांना सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीमध्ये साधना करून सूर्यदेवाला शांत केले आहे.






Source link