
एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य करणारी जोडी म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार. पण गेल्या कित्येक वर्षात ते दोघे एकत्र दिसले नाहीत. आता जवळपास २४ वर्षांनंतर ही जोडी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहे. अशातच रवीनाची जुनी मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रवीना तिच्या आणि अक्षयच्या तुटलेल्या साखरपुड्यावर वक्तव्य केले आहे.







