
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील गाव नदीवरील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर एकजण थोडक्यात बचावला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.




