
आता इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आयेशा आणि श्वेता विरोधात चांगलंच बंड पुकारलं आहे. सगळ्या एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत. त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आहेत. आता दीपा, सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेतलं आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत.








