
सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींच्या वर्णाची तुलना करून दीपावर गंभीर आरोप केले जात आहे. कार्तिकी तुमच्यासारखी दिसत नाही, म्हणून तुम्ही तिच्यावर फारसं प्रेम केलं नाही आणि तिला वाईट वागणूक दिलीत, असे आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र, आपण आपल्या दोन्ही मुलींवर समान प्रेम करतो आणि त्यांना कधीच अंतर दिलं नाही, असं दीपा म्हणते. येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. आता दीपा-सौंदर्या मिळून कार्तिकीला शोधू शकतील का, हे लवकरच कळणार आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.







