
कार्तिक दीपाला एका मालिकेचा भाग दाखवत असताना, त्यात नायकाच्या चुकीमुळे नायिकेचा जीव जातो. त्यावेळी कार्तिक म्हणतो की, या बायका कशा असतात, पुरुषावर इतका विश्वास ठेवतात आणि जीव गमवतात. यावर दीपा म्हणते की, मी तिच्या जागी असते, तर नवऱ्याचा हात पकडून त्याला देखील स्वतःबरोबर दरीत घेऊन गेले असते. दीपाचे हे बोलणे ऐकून आता कार्तिकला धक्का बसणार आहे.





