
आता आयेशा आणि दीपा एकमेकींसमोर येणार का? आणि या दोघी एकत्र आल्याच तर मालिकेत पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. दिपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असा गैरसमज झालेला कार्तिक तिच्यावर सूड उगवत आहे. मात्र, याची कल्पना असून देखील दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.