
रामदास आठवले २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी महाडमध्ये होते. त्यानंतर ते आज महाबळेश्वरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी साताऱ्यात आले होते. गुरुवारी वाईतून मुंबईला जाताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोरच्या वाहनावर त्यांची गाडी आदळली. यामध्ये रामदास आठवले यांच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले आहे. कारमध्ये रामदास आठवले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा व आईही होती. मात्र सुदैवाने सर्व सुखरुप आहेत.





