
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, यावर्षी 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपासून आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात (22 जानेवारी) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या () उपस्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा (Ram Mandir Inauguration) पार पडला. उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी पासूनच अयोध्येत भाविकांची रीघ लागलेली दिसत होती. आता या संदर्भात एक माहिती समोर आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय सांगितले की, राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठे’पासून आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. मंदिरात दररोज एक लाखाहून अधिक पर्यटक आशीर्वाद रामलल्लाच्या चरणी नतमस्तक होतात.
हे सुद्धा वाचा
मंदिराभोवती बांधणार 14 फूट रुंद सुरक्षा भिंत
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस यांनी सांगितलं की, राम मंदिराभोवती 14 फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे, ज्याला ‘परकोटा’ म्हटले जाईल. ते म्हणाले, “ज्या मंदिरात राम लल्लाचा अभिषेक झाला होता, त्या मंदिराचा फक्त तळमजला पूर्ण झाला आहे, पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराभोवती 14 फूट रुंदीची सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीला मंदिराचा ‘परकोटा’ म्हणतात. ते म्हणाले की ‘परकोटा’ हा बहुउद्देशीय क्षेत्र असेल ज्यामध्ये 6 अतिरिक्त मंदिरे असतील.










