
‘मी ११ लाख रुपये देईन पण…’
राखी सावंत आणि अली काशिफ खान यांना भविष्यात आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणीही त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. समीर वानखेडे यांनी सध्या त्यांच्या पोस्टवरील कमेंट्स सेक्शन बंद केले आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना वकील अली काशिफ खान म्हणाले की, ‘जेव्हा जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलले जाते, तेव्हा बदनामी होत नाही, असे कायद्यात म्हटले आहे. आयपीसीच्या कलम ४९९मधील दुसरा परिच्छेद ‘लोकसेवकांच्या सार्वजनिक वर्तन’बद्दल भाष्य करतो. सार्वजनिक कार्ये पार पाडताना सार्वजनिक सेवकाच्या वर्तनाचा आदर करून किंवा त्याच्या चारित्र्याचा आदर करून कोणतेही मत सद्भावनेने व्यक्त करणे ही बदनामी नाही, असे त्यात म्हटले आहे. आता हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही त्यावर योग्य उत्तर देऊ. जर, त्यांनी त्यांचा मुद्दा बरोबर असल्याचं सिद्ध केलं, तर मी त्यांना ११ लाख रुपये देईन.’








