Rajsthan Election | राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध भाजप प्रभावी उमेदवार देऊ शकले नाही, जाणून घ्या याचे महत्त्वाचे कारण…. | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Rajsthan Election | राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध भाजप प्रभावी उमेदवार देऊ शकले नाही, जाणून घ्या याचे महत्त्वाचे कारण…. | Navarashtra (नवराष्ट्र)


Rajsthan Election

Rajsthan Election

सरदारपुरा/राजस्थान : एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक असेल, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ कोणता, ते विजयी होतील का नाही? त्यांच्या विरोधात कोण? असे अनेक प्रश्न पडतात. राजस्थानमध्येही त्याचीच उत्सुकता आहे. राजस्थानचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे सरदारपुरामधून सलग सहाव्यांदा रिंगणात असून, या मतदारसंघाचे तेच सरदार असल्याचे दिसून येते.

सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला

सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९८० पासून आतापर्यंत झालेल्या दहापैकी सातवेळा या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यापैकी गेली सलग पाच वर्षे गेहलोत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. एकदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज्यभर प्रचारासाठी फिरणारे गेहलोत प्रचाराची सांगता आपल्या मतदारसंघात करतात, त्यासाठी कालच त्यांचे मतदारसंघात आगमन झाले आहे.

जोधपूरच्या विकासात गेहलोत यांचे मोठे योगदान

जोधपूरच्या विकासात गेहलोत यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या या ठिकाणी चांगले रस्ते आहेत, पिण्याची पाण्याची तक्रार नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला आहे. या शहराला लागून असलेला भाग मात्र कंगाल दिसत असला तरी सरदारपुरा आणि जोधपूर शहर गेल्या वीस वर्षांत प्रचंड बदलले आहे. या शहरात एम्म, आयआयटीसारख्या मोठ्या संस्था आणल्या गेल्या, त्याचे श्रेयही स्थानिक गेहलोत यांना देतात.

उचभ्रू वस्तीतही ते फेरफटका मारतात

प्रचार सांगता होते त्यादिवशी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पायी मतदारसंघ पिंजून काढणे हे गेहलोत यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अगदी झोपडपट्टीपासून उचभ्रू वस्तीतही ते फेरफटका मारतात. याउलट भाजपकडून दरवेळी नवा चेहरा त्यांच्याविरोधात दिला जातो. मुळात त्यांचे काम बघून त्यांच्या विरोधात लढायलाच कोण तयार होत नसल्याची स्थिती आहे.

यावेळी प्राध्यापक म्हणून दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले प्रोफेसर महेंद्रसिंग राठोड यांच्या गळ्यात भाजपने उमेदवारीची माळ घातली आहे. ते आव्हानही उभा करू शकलेले नाहीत, हे या मतदारसंघात फिरताना जाणवले.





Source link