
राज ठाकरे म्हणाले की, वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. त्यामुळेमाझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा, असे राज यांनी म्हटले आहे.





