
महामार्गाची पाहणी केल्यानंतरमुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्रात कोकणाचीच नाही तर अनेक रस्त्यांची तीच हालत आहे. हे खड्डे आज पडलेले नाहीत. २००७ मध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चालू झालं. काँग्रेस, शिवसेना भाजप सरकार आलं. ना आकार ना उकार कोणाकोणाचं सरकार आलं, मात्र काय झालं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप गोष्टी सांगतात आश्वासन देतात. निवडणूक आल्यावर करु बघू म्हणतात’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.




