Raj Thackeray : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे सरकारला पत्र, मनसैनिकांनाही केलं ‘हे’ आवाहन

0
20
Raj Thackeray : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे सरकारला पत्र, मनसैनिकांनाही केलं ‘हे’ आवाहन


राज ठाकरेंनी सरकारला लहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रातील स्थितीही काही वेगळी नाही. उष्णतेची लाट आली आहे, असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.’, असे म्हणत राज ठाकरे यांनी हवामान खात्याने आधीच उष्णतेची लाट येण्याची कल्पना का नाही दिली असा सवाल उपस्थित केला आहे.



Source link