
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. @Just.indian.things या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि २० हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले की, “संपूर्ण कोचमध्ये फक्त ४ डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. होय, लोकांना काही नागरी ज्ञानाची गरज आहे, परंतु प्रत्येक डब्यातील डस्टबिनची संख्या देखील वाढवायला हवी.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “१४० कोटी लोक स्वच्छतेसाठी वचनबद्ध असल्याशिवाय भारत “विकसनशील देश” वरून “विकसित देश” मध्ये कधीही बदलणार नाही, मग कोणताही राजकीय पक्ष केंद्रस्थानी असो.”







