
देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो होतो. माझ्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे, असाच अनुभव आल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
वाराणसी : देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो होतो. माझ्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे, असाच अनुभव आल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चौथ्यांदा बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली आणि नतमस्तक झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सुरू होऊन 35 दिवस झाले आहेत. राहुल यांचा ताफा चर्चमार्गे मांडूवाडीहच्या दिशेने रवाना झाला.








