
बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्येशी उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संबंध असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नवी दिल्ली : बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्येशी उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संबंध असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दाखल खटला रद्द करण्याच्या मुख्य मागणी गांधी यांनी याचिकेतून केली आहे.
याचिकेवर मंगळवारी न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी ५ डिसेंबर रोजी निश्चित केली. बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर जो कोणी भाजप-आरएसएस विचारसरणीच्या विरोधात बोलतो त्याच्यावर दबाव आणला जातो अन्यथा मारहाण होते किंवा मारले जाते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते.










