
हिंदू धर्मात ‘शक्ती’ हा शब्द आहे. आम्ही एका शक्तीविरुद्ध लढत आहोत,’ असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, अग्निवीर ाचा मुद्दा हे देशातील महत्त्वाचे मुद्दे आज प्रसारमाध्यमे मांडत नाहीत म्हणून आम्हाला हा प्रवास करावा लागला. हे सर्व मुद्दे आज माध्यमांमध्ये दिसत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.







