
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी (२२ जानेवारी) भीषण रेल्वे अपघात झाला. लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली. उडी मारून जवळच्या दुसऱ्या ट्रॅकवर आले, जिथे दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.