
पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजित बंडोपाध्याय यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ती हादरवून टाकणारी होती. ‘आरोपी मुलाला शाळेतून घरी जायचं होतं. एखादी मोठी घटना घडली किंवा कुणाचा मृत्यू झाला तर शाळेला सुट्टी जाहीर केली जाईल, असं त्याला वाटत होतं. म्हणून त्यानं सहा वर्षांच्या चिमुरड्याला मारून टाकलं, असं चौकशीत समोर आल्याचं एसपी बंडोपाध्याय यांनी सांगितलं. तो बोलतोय ते खरं आहे की यामागे आणखी काही आहे याचा तपास आम्ही करत असल्याचं बंडोपाध्याय म्हणाले.








