
अश्विनीवर अपघाताच्या ५० तासांनंतर जबलपूरच्या गौरीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनीच्या आई-वडिलांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांनी अश्विनीची बदनामी करू नये. अश्विनी आणि अनिश या मृत्यू झालेल्या दोघांना कपल म्हणण्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहेत. एकाच संस्थेत काम करणारे सगळी मुलं-मुली कपल नसतात,आमची मुलगी तर निघून गेली आहे,पण मीडियाने अशाप्रकारचे शब्दप्रयोग करून त्यांची बदनामी करू नये,असं आवाहन अश्विनीच्या आईने केलं आहे.







