
रविवारी पानशेत धरण ९४ टक्के क्षमेतेने भरले होते. त्यामुळे धरणातून कधीही पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे खात्याने दिला होता. त्यानुसार आज सकाळ पासून १५ हजार क्युसेकने धरणात पाणी सोडण्यात येत आहे. ही पाणी खडकवासला धरणात येत असल्याने या धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदीपात्र ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण परिसरात कोणीही उतरू नये व नदी मधील शेती पंप , नदी काठची शेती अवजारे, व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.